खरेच मुसलमान हिंदूंचे दुश्मन आहेत काय?

खरेच मुसलमान हिंदूंचे दुश्मन आहेत काय?

   एकूण मुस्लमानांच्या 73% मुस्लिम समाज खेड़ेगावात राहतो! हरेक खेड़ेगावातील मुस्लिमांची वस्ति कुणबी, माळी, तेली, कुम्भार, मांग-महार-चाम्भार, कासार, आदिवासी इत्यादि अठरापगड जातींच्या वस्तिला लागून! त्यांचे व्यवसाय या जातींच्या सारखेच. किंबहुना या जातींच्या सोबतच! भाजीपाला, बाजारबाजार, कोम्बडी दुकान, चपला दुकान, हातगाडी, कापड-चप्पल दुकान, मटन दुकान, मनेरी दुकान, पिंजारी दुकान, होटेल, फ्रूट दुकान, नड्डे-लाडू-पापड़ दुकान, चिल्लर कापड दुकान, चाहा दुकान, शिम्पी दुकान, भांडी दुकान, सायकल दुकान, भंगार दुकान, पानठेले... वगेरे!! प्रत्येक दुकानात एखादा "बाबा" किंव्हा मक्का-मदीना चा फ़ोटो, ज्यासमोर दुकान चालू करण्यापूर्वी अगरबत्ती लावून "बरकत" मागून घेणार! त्याच्या बाजूला हिन्दू ची दुकान, ज्यात लक्ष्मी-राम-गणपति चा अगरबत्ती लावलेली फ़ोटो..  आणि आपल्या आयुष्याच्या "जगण्याचा" अर्थ श्रमात शोधनारा हा अठरापगड जातीचा मुस्लिम समाज! सण-त्योहार-ईद-उरुस-जत्रा वगेरेत सर्व मिळून-मिसळून राहणारा हिन्दू-मुस्लिम समाज! संकटात, नैसर्गिग सुखदुःखात धावून जाणारा समाज आणि ज्याला मुळात "इस्लाम" म्हणजे "अल्लाह" आणि "नमाज" एवढंच माहित असते! कुरान किंव्हा त्यातील आयती कधीतरी लहानपणी वाचलेल्या, मात्र अर्थ न समजलेल्या, पवित्र म्हणून 2-4 आयती (श्लोक) घोकुन घेतलेला आणि नमाजिसाठी त्यांचा उपयोग करणारा, सर्वसमाजासोबत अत्यंत सहज जगणाऱ्या या काष्टाळु समाजाला खरा सुख-दुखाचा आधार हा त्याच्या भोवती असलेल्या समाजाचा असताना, या अत्यंत कमी शिक्षण असलेल्या मुस्लिम समाजाला "हिन्दूधर्म आणि हिंदूंचा शत्रू" कोण ठरवीतो? तर ते ठरवितात, ज्यानी "धर्माच्या" नावाने चतुवर्ण आणि जात व्यवस्थेत स्वतःला ब्रम्हाच्या तोंडातून जन्माला घालून या सर्व अठरापगड जातीना (सध्या जे हिन्दू आहेत, आणि सध्या जे मुस्लिम आहेत) त्यांना पायातून जन्माला घालून अतिशूद्र ठरवून सर्व हक्क, अधिकार, शिक्षण, संस्कृति, धर्म प्रवेश नाकारला! आता याच जातीतिल हिन्दू जातीना हे मुस्लिम शत्रु आहेत म्हणून पुस्तके, धर्मग्रन्थ, सिनेमा, नाटके, प्रवचन इत्यादितून सांगताहेत! ज्यानी "हिन्दू" म्हणूनच या अठरापगड हिन्दू जातीना जनावरागत जगने धर्माज्ञा ठरविले! त्या हिन्दूना, ज्याना पायाचे तीर्थ प्यायला लावले, त्यांनाच आता मुस्लिमांचे रक्त सांडविण्यास सांगताहेत! त्या हिन्दुजातिना ज्याना शुद्र म्हणून कधीच ग्रन्थ वाचण्यास, धर्मक्षेत्रात प्रवेशास, शिक्षणास बंदी केली, त्याच हिन्दूना सांगताहेत की तुमच्या धर्माचे शत्रु मुस्लिम आहेत! सर्व क्रांतिकारी सन्तानचा, मग चक्रधर असो, बसवेश्वर, शिवाजी महाराज आसोत की सन्त तुकाराम असो की महात्मा फुले, बाबासाहेब आम्बेडकर आसोत या सर्वांचा चळ ज्या ब्राम्हणी व्यवस्थेने केला त्यांची संघटना "आरएसएस" हे सगळं सांगतेय! बरे, संगणारे "संघ" पठडितिलच असले तरी "धारकरी व हाकेकरी" बहुतेक ओबीसी व अन्य हिन्दू मागसवर्गीय आहे, ज्यानी प्रत्यक्ष व्यवहारात या मुस्लिमांचे शत्रुत्व कधी अनुभवले नाही! 

         "शत्रु" म्हणून मुस्लिमानी काय केले तुमच्या सोबत? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही! नौकरी खाल्ली की तुमची बैंक लुटली? तुमचे आरक्षण खाल्ले की तुमची योजना खाल्ली? शिक्षण संस्थेत तुमचे शोषण केले की स्कॉलरशिप खाल्ली की लाखों रुपये डोनेशन "हिंदुला शिक्षक, प्राध्यापक म्हणून लावताना खाल्ले? पुलिस बनून तुम्हावर अन्याय केला की अधिकारी बनून जुलुम केला? तुमच्या जमीनी फस्ता केल्या की गावे उजाड़ केली? जंगल लुटले की डोंगर लुटले? उत्तर नाहीये हिन्दू जातींकडे!! मात्र, "संघी कलम कसायानी" खोटे-नाटे लिहायचे, धर्मद्वेष शिकवायचा आणि आपले केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक व समग्र वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मुठभर गरीब, अशिक्षित मुस्लिमा सोबत इतर मुस्लिमाना शत्रु ठरवून हल्ले, दंगली, मशीद-दर्गावर हल्ले करण्यास या हिन्दू जातीना भडकवायचे आणि मुस्लिमांच्या अंगावर सोडायचे, हे जोरात चाललेय! यात सर्वात मोठा वाटा त्या "राजकीय जमातीचा" आहे, जे सत्तेसाठी भारतीय समाजाचाच बळी घेत आहेत... लोकशाहिचा बळी घेत आहेत! दंगलीच्या माध्यमातून घडविलेल्या ध्रुविकरनावर निवडून यायचे आणि खासदार, आमदार, मंत्री होत असताना "संविधाननिष्ट" राहण्याची शपथ घ्यावी... सर्व मस्त चाललेय...

    मात्र, खरेच हिन्दूनीं शांतपणे विचार करावा... मुस्लिम त्यांचे शत्रु आहेत काय???

    - प्रा. जावेद पाशा