औरंगाबाद शहर पोलीसांची जबरदस्त थरारक कामगिरी

औरंगाबाद शहर पोलीसांची  जबरदस्त थरारक कामगिरी

औरंगाबाद, ७ सप्टेंबर : आज सकाळी औरंगाबाद शहर पोलिसांनी एक धाडसी आणि जबरदस्त कारवाई करीत संपूर्ण राज्याला हादरवून सोडले! 

      फीरोजपूर, पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या सात अत्यंत खतरनाक आरोपींना अटक करण्यात आली. या धक्कादायक घटनेत एका तरुण महिलेची, जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते, निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शस्त्रांनी सुसज्ज असलेले हे आरोपी वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पळत आले. पण, नशिबाने या आरोपींना औरंगाबाद शहरातील शूर पोलीस दलाच्या हातातून सुटणे अशक्य होते!

       आज पहाटे ३:०० वाजता औ औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचे मोबाइलवर पंजाब पोलिसांच्या AGTF चे ADG प्रमोद बान यांचा फोन आला. अत्यंत गंभीर आणि तातडीची मदत हवी होती. त्यांचे शब्द थरारक होते त्यांच्या टीमकडे वेळ नव्हता, आणि आपलीच टीम या मिशनसाठी पुढे जाणार होती! क्षणाचाही विलंब न करता औरंगाबाद शहर पोलीस दलाने सर्व तयारी करून आरोपींचा मागोवा सुरू झाला.

      MH26AC5599 क्रमांकाची इनोव्हा आरोपींनी भरधाव वेगाने पळवलेली! पण समृद्धी महामार्गावरून पळणाऱ्या त्या गाडीला सकाळी ५:४५ वाजता औरंगाबाद शहर पोलीसांनी चक्रव्यूहात अडकवले! अत्यंत धाडसी योजना आखून क्राईम ब्रांच चे पोलीस इन्स्पेक्टर संदीप गुरमे आणि सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील १० अधिकाऱ्यांच्या आणि ४० कर्मचाऱ्यांच्या टीमने, QRT सह सज्ज होऊन, आरोपींना शस्त्रांनी सुसज्ज असतानाही त्यांच्या हिशोबाने घेरले.

       बुलेटप्रूफ जॅकेट्समध्ये सज्ज पोलीस पथकाने  जणू एक रणांगणच सजवलं होतं! गोळ्या कधीही सुटू शकल्या असत्या, पण  पोलीस पथक अत्यंत दक्ष होते!

       ही कारवाई जणू एखाद्या चित्रपटातली थरारक घटना वाटावी अशीच होती. श्वास रोखून धरावा लागेल अशी ती धाडसी मोहीम. औरंगाबाद शहर पोलीसांना मिळालेल्या माहितीने ही लढाई जिंकली, आणि शूर पोलिसांनी सातही आरोपींना पळ काढण्याआधीच त्यांच्या मुस्क्या आवडल्या.

        औरंगाबाद शहर पोलीस पंजाब पोलीस आमच्याशी सातत्याने संपर्कात आहेत, आणि आरोपींना आज संध्याकाळी त्यांच्या ताब्यात दिले जाईल.

     औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तांनी या अभियानात सहभागी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे  अभिनंदन केले.