महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती; २६ जानेवारी २०२५ रोजी घोषणा अपेक्षित

महाराष्ट्र शासन २६ जानेवारी २०२५ रोजी राज्यात २१ नवीन जिल्ह्यांची घोषणा करणार आहे. सध्या असलेल्या ३६ जिल्ह्यांमधून विभाजन करून हे नवीन जिल्हे निर्माण केले जाणार आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन अधिक कार्यक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवीन जिल्ह्यांची यादी आणि मूळ जिल्ह्यांपासूनचे विभाजन:
भुसावळ - जळगाव
उदगीर - लातूर
अंबेजोगाई - बीड
मालेगाव - नाशिक
कळवण - नाशिक
कंधार - नांदेड
मीरा-भाईंदर - ठाणे
कल्याण - ठाणे
माणदेश - सांगली/सातारा/सोलापूर
खामगाव - बुलडाणा
बारामती - पुणे
पुसद - यवतमाळ
जव्हार - पालघर
अचलपूर - अमरावती
साकोली - भंडारा
मंठा - जालना
महाड - रायगड
श्रीगोंदा - अहमदनगर
संगमनेर - अहमदनगर
श्रीरामपूर - अहमदनगर
अहेरी - गडचिरोली
नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासन सुधारण्याबरोबरच स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाने स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद उमटत असून, ही घोषणा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.